MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 126 ते 130 ची उत्तरे द्या. तारुण्य म्हणजे जीवनाच्या वृक्षाला आलेला सुवासिक मोहोर. हा एकदाच येतो. पण जेव्हा येतो तेव्हा नवचैतन्याची पालवी फुटते, रसभावनांची फुले फुलून येतात, उन्मादाचा गंध दरवळायला लागतो, कित्येक स्वप्नांचे कांचनमृग दृष्टीसमोर उभे राहतात. अशा वेळी सुखे तर हवीशी वाटतातच; पण दु:खांनाही आमंत्रण द्यावे आणि त्यांना प्रेमभराने कुरवाळावे असे वाटते. पण हा मोहोर गळून पडल्यावर त्याचा मागमूसही राहत नाही. म्हातारपणाच्या निष्पर्ण फांद्या आणि काटक्या मात्र गेलेल्या तारुण्याची केविलवाणी साक्ष देत उभ्या असतात. खरे तर वार्धक्यही यौवनाइतकेच नैसर्गिक नाही का? ते केव्हातरी येणारच असते. त्यातही जीवनाचे काही सौंदर्य असतेच. पिकलेल्या फळाला जशी एक रुची असते तसे पिकलेले जीवनही रुचिर आणि प्रसन्न असायला हरकत नाही. तृप्ती आणि विरक्ती यांचे छानदार मिश्रण म्हणजे म्हातारपण असे म्हणता येईल. म्हातारा होईपर्यंत जगणे हे एक भाग्याचे लक्षण मानले जाते; पण माणसे वार्धक्याला घाबरतात. ते येऊ लागले की त्याची वाट अडविण्याचा प्रयत्न करतात. गाळलेल्या जागा भरा. म्हातारपण म्हणजे .... आणि .... यांचे छानदार मिश्रण. |
| A. | तृप्ती आणि विरक्ती |
| B. | फांद्या आणि काटक्या |
| C. | रुचिर आणि प्रसन्न |
| D. | स्वप्न आणि कांचनमृग |
| Answer» B. फांद्या आणि काटक्या | |