1.

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 44 ते 48 ची उत्तरे लिहा. प्राचीन काळांत सहज ओझरती नजर फेकली, तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येईल. यास्काचार्याच्या नुसत्या निरुक्तांत पाहिले तर वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टीच्या शेकडों मंडळांची नावे त्यांत आलेली आहेत. इतिनैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिका: अशी निरनिराळी अभ्यासमंडळे यास्क देत आहेत. तसेच उपनिषत्काली सर्वत्र तत्त्वज्ञानाची प्रचंड व अखंड चर्चा चाललेली दिसते. शेंकडों मते, शेकडों पंथ, शेकडों सूक्ष्म छटांचे तत्त्वज्ञानी आपणास दिसून येतात. मीमांसक ईश्वर मानीत नसत; चार्वाकपंथी परलोक वगैरे मानीत नसत. कणाद वगैरे सारी सृष्टि परमाणूपासून झाली असे म्हणत. बुद्धपंथी सारे क्षणिक आहे असे मानीत. शेकडों मतें होती; परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणा-यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान म्हणजे पोरकटपणा समजण्यात येत नसे. एकेक गोष्ट समजून घ्यावयास तपेंच्या तपे देत. उपनिषद अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्यपालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनांत गढून जात, ते आले आहे. " मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जाई. क्षत्रिय ब्राह्मणाकडे जाई. ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठीं नम्रपणे जाई. ज्ञान कोठेहि असो, ते पवित्र आहे. सुर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाचीं दृष्टि हवा. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडेहि जाईल आणि दैत्यांचा गुरुहि शत्रूकडच्या शिष्याला प्रेमाने सारे ज्ञान देईल. ज्ञानाच्या प्रांतात शत्रु - मित्र नाहीं. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोर साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दसरे काय आहे? चिंतन करून आपणांस जो विचार सुचला, त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याचा वाढ केली पाहिजे, तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचे बाह्य स्वरूप कोणतेही असेल. त्यात्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य नि:स्वार्थपणे कसा धडपडता आहे, ते पाहिले पाहिजे. ज्ञानाचे बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहील. त्या पाणिनीस भगवान ही पदवी भारतीय संस्कृती देईल. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा सदैव करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दसरे तिसरे कांहींच सुचत नव्हते, रुचत नव्हते. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदान्त. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवीत. एके दिवशी तपोवनांत ते व्याकरण शिकवीत असता एकदम एक वाघ आला. वाघाला पाहून पाणिनी पळाले नाहींत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते व्युत्पत्ती सांगू लागले! वाघ हंगत हुगत येत होता. पाणिनी म्हणाले, “वास घेत घेत येणारा हा पाहा वाघ." ‘व्याजिघ्रति स व्याघ्रः पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केंव्हाच पळून गेले होते! वाघाने पाणिनीवर झडप घालून त्यांना खाऊन टाकलें! ज्ञानाची किती थोर उपासना! ज्ञानाची उपासना करणारा सर्व काहीं विसरून जातो. त्याच त्या विचारांशीं तो तन्मय होतो. त्याची जणू समाधि लागते. समाधि म्हणजे सर्वत्र ध्येयाचाच साक्षात्कार होणे. समाधि म्हणजे ध्येयतर सृष्टी चे विस्मरण! समाधि म्हणजे सर्व सृष्टीचे विस्मरण नव्हे. 48. ज्ञानाची उपासना करणा-याची अवस्था कशी होते?

A. वेदांचे ज्ञान प्राप्त होते.
B. तो नवविचारांनी परिपूर्ण होतो.
C. त्याला ध्येयेतर सृष्टीचे विस्मरण होते.
D. त्याला वाघाकडून मृत्यू येतो.
Answer» D. त्याला वाघाकडून मृत्यू येतो.


Discussion

No Comment Found

Related MCQs