1.

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्र. ११६ ते १२० ची उत्तरे लिहा. शहरांत राहावयाला आलो, तरी निसर्गाची संगत मी सोडलेली नाही. मुंबईत समुद्र हा माझा सोबती आहे. त्याच्या लाटांची अहोरात्र चाललेली मर्मर हे माझ्या जीवनातले पार्श्वसंगीत आहे. भरतीच्या आणि ओहोटीच्या तालावर माझ्या मनोवृत्ती अक्षय नाचत असतात. किना-यावरच्या उंच-उंच माडांच्या नि नारळींच्या झाडांप्रमाणे मीही वा-याच्या सोसाट्यामध्ये धुंद होऊन अष्टौप्रहर डोलत असतो. पहाटेच्या वेळी अंगावर लाटांचे तुषार झेलीत ओल्या आणि भुसभुशीत वाळूवर अनवाणी पावलांनी चालण्यात केवढे काव्य आहे? पण पुष्कळ लोक पायांत बूट घालून अन् सारे अंग लोकरी कपड्यांत पॅकबंद करून समुद्रावर हिंडायला येतात. मी त्यांना म्हणतो, अरे, परमेश्वराचे तीर्थ उडू द्या थोडे अंगावर, त्याचा श्वास शिरू द्या तुमच्या नाकातोंडात. निसर्गाच्या देवळांतही बाहेर जोडे ठेवून शिरायचे असते।'' पण कोण ऐकतोय? निसर्गाला कोणी संधीच देत नाही. समुद्र म्हणजे त्यांना शत्रू वाटतो. अंगात चिलखते' घालून त्याला भेटायला येतात. मुंबईच्या सागराप्रमाणे खंडाळ्याचा डोंगरही माझा मित्र आहे. मी बारक्यासारक्या लोकांशी मैत्री करीतच नाही. या डोंगरावर माझे एक घर आहे. पुष्कळदा मी तिथे राहतो. माझे सारे लेखन मी तिथेच करतो. मला काही ‘योग’ येत नाही, पण खंडाळ्याला गेलो की ताबडतोब माझी समाधी लागते. माणसांचे जग मी पार विसरून जातो. उंच-उंच डोंगरावर निळेभोर आभाळ बसलेले असते. तास न् तास मी त्याच्याशी गोष्टी करीत असतो. आभाळाच्या कापसांत बुबुळे गुंडाळून ठेवली म्हणजे उघड्या डोळ्यांनी झोपल्यासारखे वाटते. झाडाझुडपांच्या आणि झ-यांच्या संगतीत दिवस कसा निघून जातो हे कळत नाही. 118.लेखकाचा कोणाच्या संगतीत कसा दिवस निघून जातो हे कळत नाही ?

A. झाडेझुडपे आणि झरे
B. शत्रू
C. आळशी मित्र
D. टवाळखोरात
Answer» B. शत्रू


Discussion

No Comment Found

Related MCQs