MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
पुढील उतारा वाचून त्याखालील प्र. क्र. 111 ते 115 ची उत्तरे लिहा. बाबा आमटे यांच्या निधनामुळे समाजाला प्रकाश देणारा एक महामानव काळाच्या पडद्याआड गेला आहे. कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगता यावे, कुष्ठरोगाबद्दलचे समाजातील गैरसमज नष्ट व्हावेत याकरिता बाबा आमटे यांनी जे कार्य केले, ते अद्वितीय आहे. बाबा आमटे आणि साधनाताई यांचे जीवन हे एक महाकाव्य आहे. बाबांचे निधन त्यांच्या वयाची व्याण्णव वर्षे उलटून गेल्यावर झाले; परंतु ते मनाने चिरतरुणच राहिले. महात्मा गांधींचे जीवन हे बाबा आमटे यांच्या जीवनाचे प्रेरणास्थान होते. कुष्ठरोगी हा ज्या वेळी आपल्या समाजात तिरस्काराचा, अवहेलनेचा, उपेक्षेचा विषय होता, त्या वेळी कुष्ठरोग झालेल्या परचुरे शास्त्रींना आपल्या आश्रमात ठेवून गांधीजींनी स्वतः त्यांची सेवाशुश्रूषा केली. बाबांचे वैशिष्ट्य हे की, वरोच्याजवळ आनंदवनात हे कार्य उभे करताना त्यांनी कुष्ठरोग्यांच्या समस्येबद्दल समाजाला खडबडून जागे केले आणि या रोगाच्या निर्मुलनाची चळवळ उभी केली. कुष्ठरोग्यांना थोट्या हातांनी श्रम करून स्वावलंबी जीवन जगता येते, हे दाखवून देतानाच कुष्ठरोग्यांच्या झडलेल्या अवयवांपेक्षा कुष्ठरोग्यांचा तिरस्कार करणा-या व्यक्तींचे मन अधिक हिडीस असते. हे बाबांनी सडेतोडपणे सांगितले. बाबांनी कोणती चळवळ उभी केली? |
| A. | श्रमदानाची |
| B. | कुष्ठरोग निर्मूलनाची |
| C. | आश्रम उभारण्याची |
| D. | खूप पैसे मिळविण्याची |
| Answer» C. आश्रम उभारण्याची | |