1.

पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 55 ते 57 ची उत्तरे लिहा. । । पशू बदलत नाहीत. त्यांची निवासस्थाने, जीवनशैली आणि भाषा या गोष्टी बदलत नाहीत. अनेक माणसांनाही असे न बदलणे सोयीचे म्हणून प्रिय ठरते. ही माणसे मग परिवर्तनापुढे संकटांचे डोंगर उभे करतात. या डोंगरांना नष्ट करीतच परिवर्तनवाद्यांना माणुसकीची वाट निर्माण करावी लागते. हे परिवर्तनवादी लोक परिवर्तनाला प्रतिष्ठा देतात. गती देतात. परिवर्तन रोखणाच्या विकृतींशी त्यांना सतत झगडावे लागते. स्वत:च परिवर्तन व्हावे लागते आणि परिवर्तन जन्माला घालावे लागते. परिवर्तन ही स्वत:चे एक संस्कृती असते. जीवन नवनव्याने निर्माण करणाच्या प्रयोगाचेच ते वर्णन असते. साहित्याने या प्रयोगाचा हात सोडायचा नसतो. जीवनाचे परिवर्तनाला दीपस्तंभ मानायचे असते. परिवर्तनाला पारखे होणारे जीवन निर्जीव होते आणि परिवर्तनाच्या मुखाने बोलणे नाकारणारे साहित्यही मुके होते. अर्थात आजवर परिवर्तनवाद्यांनी जीवनाचाही आणि साहित्याचाही प्रवाह आटू दिला नाही. जहरी फॅसिझमशी झगडत भाडत त्यांनी मानवाच्या मुक्तीची महाकाव्ये जन्माला घातली. मानवी न्यायाचा विजय साजरी करणारी वाङ्मयीन महत्तेची शिखरे उभारली. विषमतेच्या काळ्या साम्राज्याविरुद्ध निर्वाणीचे संग्राम पेटवले. सूर्यकुलाचा वारसा समृद्ध केला. परिवर्तनाच्या मूल्यांशी फारकत घेणारे आणि माणुसकीच्या प्रस्थापनेकडे पाठ फिरविणारे लोक कलावादी होतात. फॅसिस्ट, तटस्थ आणि विद्रोही असे तीनच प्रकारचे लोक असतात आणि असे तीनच प्रकारचे लोक साहित्यिकही असतात. कलावादी समीक्षक हे पहिल्या दोन प्रकारच्या लोकांचे आणि लेखकांचे प्रवक्ते असतात. हे लोक, हे लेखक आणि हे समीक्षक प्रतिगाम्यांना अतोनात प्रिय असतात. तिस-या प्रकारचे म्हणजे विद्रोही लेखक शोषणाच्या विरोधात संघर्षात उभे राहतात. हे लेखक, त्यांचे समीक्षक आणि त्यांचे वाचक हे परिवर्तनाचे प्रवक्ते असतात. त्यामुळेच प्रतिगाम्यांना ते आपले अत्यंत स्पष्ट आणि सख्खे शत्रु वाटत असतात. शेवटी या सर्वच व्यवहारातील वरील सर्वच घटकांचे मानसशास्त्र डोके ठिकाणावर ठेवून मूलभूत पातळीवरून तपासून पाहावे लागते. ते प्रतिगाम्यांच्या तळ्यात आपली कमळे फुलवितात की परिवर्तनाच्या मळ्यात आपली माणुसकी फुलवितात हे पाहणे आवश्यक असते. इतरांसोबतच लेखकांच्या विचारांना आणि भावनांनाही एक वर्गचारित्र्य असतेच. खरी परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम हे वर्गचारित्र्य अधोरेखित करते. लेखकाच्या शब्दांची भूमिका त्याशिवाय लक्षातच येत नाही. लेखकाचा शब्द आपल्याकडे मृत्यू घेऊन येतो आहे की जीवन घेऊन येतो आहे ते कळत नाही. आपण वाचतो तो शब्द शत्रू आहे की मित्र आहे ते कळत नाही. परिवर्तनवादी वाङ्मयीन अभिरुची प्रथम शब्दामागच्या लेखकाची निश्चिती करते. त्यामुळे ती अभिव्यक्तीच्या मोहक चकव्यांना भुलत नाही आणि विंचवांची माळ गळ्यात घालत नाही. | आपल्याकडे अशा विंचवांच्या माळा गळ्यात घालणारे खूप असले तरी कपटी लोकांची कारस्थाने ओळखणारे जागते पहारेही पुष्कळच आहेत. परिवर्तनानेच त्यांना हा उदंड डोळसपणा दिलेला असतो. कारण परिवर्तन म्हणजे शोषणविहीन जीवनाची मूल्ये! परिवर्तन म्हणजे मानवी जीवनाच्या निर्मितीची चिरंतन प्रयोगशाळाच असते. |55. पुढीलपैकी कोणते कार्य कलावादी लोक करतात?

A. मानव मुक्तीचा लढा उभारणे.
B. परिवर्तन मूल्य व माणुसकीला विरोध करणे.
C. मानवी न्यायासाठी वाङ्मयनिर्मिती करणे.
D. विषमतेला विरोध करणे.
Answer» C. मानवी न्यायासाठी वाङ्मयनिर्मिती करणे.


Discussion

No Comment Found

Related MCQs