1.

प्रश्न क्रमांक १२१ ते १२५ साठी सूचना : खालील उतारा नीट वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. । “मालवण येथे १९५८ साली भरलेल्या चाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध कवी अनिल. ५०-५५ वर्षे सतत कविता लिहिणारा, तेजाळत राहणारा एक विलक्षण सुंदर भावकवी. पहिल्यापासून त्यांच्या कवितेवर कुणाचा ठसा उमटला नाही नि त्यांच्यासारखी कविता लिहिणारा पंथही निर्माण झाला नाही. अगदी रविकिरण मंडळाच्या समीप असूनही रविकिरण मंडळाच्या कवींच्या आसपासही कवी अनिल कधी गेले नाहीत. भावकवी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी अनिल यांनी निर्वासित चिनी मुलास' सारख्या सामाजिक आशयाच्या दीर्घ कविताही लिहिल्या. कवितेत रूपबंधाला फार महत्त्व असते, कारण ते काव्यसौंदर्याच्या अनेक अंगामधील एक महत्त्वाचे अंग आहे याची जाण कवी अनिलांना होती.'' 124.अनिलांच्या कवितेत कोणत्या गोष्टीला फार महत्त्व होते ?

A. सौंदर्याला
B. सामाजिक आशयाला |
C. रूपबंधाला
D. काव्यसौंदर्याला
Answer» D. काव्यसौंदर्याला


Discussion

No Comment Found

Related MCQs