1.

प्रश्न क्रमांक 121 ते 125 पुढील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. | आगरकर बुद्धीखेरीज अन्य कोणताही मानदंड मानत नव्हते. समाजसुधारणांचे समर्थन करताना स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मुळीच मान्य नव्हते. नीतिमान नागरिकत्व आणि सदाचरणी समाज यांच्या निर्मितीसाठी धर्म आणि ईश्वर यांची आगरकरांना आवश्यकता वाटत नव्हती. जीवनातील सर्व सद्गुण हे धर्मापूर्वीच अस्तित्वात होते. धर्माने त्याचे फक्त ग्रथन आणि प्रतिपादन केले; पण या प्रतिपादनात नाना प्रकारच्या विकृती निर्माण झाल्या. आगरकर अज्ञेयवादी असल्यामुळे पूर्वजन्म, पुनर्जन्म या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता. वर्णव्यवस्था, जातिसंस्था, अस्पृश्यता या गोष्टी स्वप्नातही त्यांना रुचल्या नाहीत. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन' हा त्यांनी परमपुरुषार्थ मानला. मात्र, त्यांच्या ‘सुखवर्धन' या संकल्पनेचा अनेकांनी विपर्यास केला. विवेकी आणि नीतिमान वर्तनामुळे लाभणारे मानसिक समाधान हे आगरकरांच्या लेखी ऐहिक सुख होते. अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक' असे म्हणणा-या संतांची आणि आगरकरांची आनंदसाधना सारखीच होती. 124.आगरकरांचा कशावर विश्वास नव्हता?

A. धर्म व ईश्वर
B. आनंदसाधना
C. पूर्वजन्म व पुनर्जन्म
D. यांपैकी नाही
Answer» D. यांपैकी नाही


Discussion

No Comment Found

Related MCQs