1.

प्रश्न क्रमांक 116 ते 120 खालील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. सहवासालाच मित्रभाव समजण्यात जशी लोकांची चूक होते, तशीच त्यांची दुसरी एक चूक होत असते. मित्र म्हटला, की तो सदैव आपली प्रशंसा करणाराच असला पाहिजे, अशी सामान्य कल्पना असते; पण मैत्री म्हणजे प्रशंसेचा निरंतर झरा समजणे कितपत बरोबर आहे? माणसाला प्रशंसाच हवी असली तर ती मिळविणे काही कठीण नाही. चार पैसे टाकून प्रशंसा बाजारात खरेदी करता येत नाही हे खरे, पण रुपेरी चाबकाने कोणतेही घोडे वठणीवर येते; या न्यायाला प्रशंसा काही अपवाद नाही. चार पैसे आपल्याजवळ असले तर प्रशंसक भोवताली सहज जमतात: पैसा, सत्ता, कला असल्या बळावर स्तुतिपाठकांचा वाटेल तेवढा तांडा जमा करता येतो. धनिकाभोवती, राजाभोवती किंवा कीर्तिसंपन्न झालेल्या नटाभोवती खुषमस्करे किती असतात पहा! पण हे। खुषमस्करे म्हणजे त्यांचे मित्र का म्हणायचे? ते सारखे मधुर भाषण करीत असतात. मधाच्या पोळ्यातून थेंब गळावे त्याप्रमाणे त्यांच्या शब्दांतून प्रशंसा गळत असते. पण मधुप्रलापी सहस्र प्रशंसकांच्या गराड्यात वावरणारा राजा, धनिक किंवा नट खच्या मित्रभावाचे एखादे तरी शीतल स्थान आपल्याला मिळेल का म्हणून जेव्हा पाहतो, तेव्हा त्याला सारे जग तप्त, रुक्ष अरण्याप्रमाणेच बहतकरून भासते. 118.मित्रभाव समजण्यात लोकांची कोणती चूक होते ? (*) (हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे.)

A. सदैव आपल्याभोवती राहतात ते मित्र समजणे.
B. आपल्या सहवासात येतात ते मित्रच समजणे.
C. आपली प्रशंसा करणारे मित्रच समजणे.
D. ) आपल्याशी मधुर भाषण करणारे मित्रच समजणे.
Answer» F.


Discussion

No Comment Found

Related MCQs