1.

प्रश्न क्र. 54 ते 58 : खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची सुयोग्य उत्तरे द्या. वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला दैनिक' म्हणतात. कधी आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला ‘साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके, नियतकालिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी, सत्ययुगात, या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत, युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे. त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्याच सख्ख्या बहिणी; त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एकजण वार्ता ऐकवते तर दुसरी वार्ता ऐकविते आणि दाखवतेपण. | वृत्तपत्रा, खरं पाहता तुझं जीवन किती लहान! केवळ एका दिवसाचं म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुमची कामगिरी मात्र केवढी मोठी ! खरोखरीच, मूर्ती लहान पण कृती महान असा तू आहेस. ज्ञानदान तू करतोसच पण त्याचबरोबर मनोरंजन करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तान्त व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसह्य करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो कळत नाही. त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस. वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवितोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस हे पाहण्याऐवजी तू काय करत नाहीस हेच पाहावे. तुझा विस्तार फार तर आठ पानी, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत. खरोखरच तू परमेश्वराचे सूक्ष्म रूप आहेस. बा! वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजास जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'काळ' बनलास. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फुलविण्यासाठी तू ‘मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू ‘सुधारक' झालास. कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास तर हरिभाऊंनी तुला ‘करमणूक' म्हणून संबोधले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू, परमेश्वराचा अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस, उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार म्हणून तर तुला त्रिवार वंदन! 57'संदेश' वृत्तपत्र कोणाचे?

A. आगरकर
B. कोल्हटकर
C. परांजपे
D. हरिभाऊ
Answer» C. परांजपे


Discussion

No Comment Found

Related MCQs