1.

प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण होऊन तीच त्यांची ‘अस्मिता' जागृत राहते, अर्थात् त्यारूपाने 'स्वदेशाभिमान जागृत राहात असतो. यांतील भाव असा की, सत्संस्कारमूलक-चांगल्यासंस्कारपूर्वक ज्या ज्या सत्कृत चांगल्या कृति, सात्त्विक कृति झाल्या, त्या त्या सत्-कृतीबद्दल त्या त्या आजूबाजूच्या मानवसमाजाच्या मनी-मानसीं आदरभाव निर्माण होतो. त्यांतूनच हळूहळू विशिष्ट अशी ‘संस्कृति' बनत असते. किंबहुना! ती संस्कृति हेच त्या देशाचे ‘भूषण-स्थान' होय. केवळ उत्तुंग इमारतींचे, रमणीय उपवनांचे, महावनांचे, सुशीतल मोठ्या जलाशयाचे वा विस्तीर्ण अशा भूभागाचे रक्षण' म्हणजे 'स्वदेशरक्षण', असे मुळींच नव्हे; तर उपर्युक्त स्वरूपाच्या संस्कृतीचे रक्षण म्हणजे खरे व उचित देशाचे रक्षण होय; समाजपुरुषाचे, लोकसंस्थेचे रक्षण होय. किंबहुना! आपल्या संस्कृतीच्या, मानवी-अस्मितेच्या, मानवी जीवनमूल्यांच्या रक्षणार्थच देशाचे व देशांतील इतर निसर्गदत्त व स्वोपार्जित सर्वपदार्थांचे, भोगसमृद्धीचे रक्षण करावे लागते, म्हणजेच मानव समाजांत सद्गुण समूह, जीवनमूल्ये हीं नांदतात आणि त्यामुळे मानवाचे–मानव समूहाचे जीवन बेरंग, बेचैन आणि दुखरे बनत नाहीं.115. सदर उता-यास योग्य शीर्षक द्या.

A. जीवनमूल्य
B. सांस्कृतिक संचित
C. संस्कृति रक्षण
D. संस्कृतीसमन्वय
Answer» B. सांस्कृतिक संचित


Discussion

No Comment Found

Related MCQs