1.

प्रश्न क्र. १११ ते ११५ : 'संस्कृति' म्हणजे त्या त्या देशाची, त्या मानव समूहाची, समाजपुरुषाची खरी ‘‘संपन्नता' होय. हर एक देशात एक सद्गुणसमूह' असतो. तो ‘सद्गुण-समूह' च त्या देशाची संस्कृति' बनवीत असतो. त्या संस्कृती प्रमाणे त्या त्या देशवासीयांची जडण-घडण होऊन तीच त्यांची ‘अस्मिता' जागृत राहते, अर्थात् त्यारूपाने 'स्वदेशाभिमान जागृत राहात असतो. यांतील भाव असा की, सत्संस्कारमूलक-चांगल्यासंस्कारपूर्वक ज्या ज्या सत्कृत चांगल्या कृति, सात्त्विक कृति झाल्या, त्या त्या सत्-कृतीबद्दल त्या त्या आजूबाजूच्या मानवसमाजाच्या मनी-मानसीं आदरभाव निर्माण होतो. त्यांतूनच हळूहळू विशिष्ट अशी ‘संस्कृति' बनत असते. किंबहुना! ती संस्कृति हेच त्या देशाचे ‘भूषण-स्थान' होय. केवळ उत्तुंग इमारतींचे, रमणीय उपवनांचे, महावनांचे, सुशीतल मोठ्या जलाशयाचे वा विस्तीर्ण अशा भूभागाचे रक्षण' म्हणजे 'स्वदेशरक्षण', असे मुळींच नव्हे; तर उपर्युक्त स्वरूपाच्या संस्कृतीचे रक्षण म्हणजे खरे व उचित देशाचे रक्षण होय; समाजपुरुषाचे, लोकसंस्थेचे रक्षण होय. किंबहुना! आपल्या संस्कृतीच्या, मानवी-अस्मितेच्या, मानवी जीवनमूल्यांच्या रक्षणार्थच देशाचे व देशांतील इतर निसर्गदत्त व स्वोपार्जित सर्वपदार्थांचे, भोगसमृद्धीचे रक्षण करावे लागते, म्हणजेच मानव समाजांत सद्गुण समूह, जीवनमूल्ये हीं नांदतात आणि त्यामुळे मानवाचे–मानव समूहाचे जीवन बेरंग, बेचैन आणि दुखरे बनत नाहीं. 112. देशरक्षण म्हणजे

A. देशातील भोगसमृद्धीचे रक्षण
B. चतु:सीमा संरक्षित करणे
C. परकीय शक्तींचा बीमोड करणे
D. देशातील सद्गुण समूहाचे रक्षण
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs