1.

खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या : ग्रीष्मऋतूत येणारे प्रमुख फळ म्हणजे आंबा, आंब्याच्या विशिष्ट स्वादामुळे त्याला फळांचा राजा म्हणतात. मंगलकार्य, सण उत्सव, देवपूजा आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आंब्याला खुप महत्त्व आहे. हा वृक्ष सर्वसाधारणपणे सहा ते पंधरा मीटर उंच असतो झाड डेरेदार आणि भरपूर सावली देणारे असते. आंब्याच्या आपल्या देशात 700-800 जाती आहेत. आंब्याच्या मोहोर, कैरी, पिकलेला आंबा, आंब्याची कोय, पाने, झाडाची साल ह्या सर्व गोष्टींची आयुर्वेदाच्या दृष्टीने वेगवेगळी उपयुक्तता आहे. आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा उसून अतिसार, रक्तदोष आणि कफ व पित्त दूर करणारा आहे. उन्हाळ्यात घामामूळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. या साठी केरीचे पन्हे उत्तम आहे. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे. आंब्यातील अ जीवनसत्व जंतूनाशक तर क जीवनसत्व त्वचारोगहारक आहे. त्यामूळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे. कोणत्याही शुभप्रसंङ्ग, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधतात. असा हा आम्रवृक्ष सदाबहार, सदाहरित आणि विपुल फळे देणारा आहे. हा वृक्ष दिर्घायू आहे. कैरीचे लोणचे, मुरंबे, सरबत, आमचूर पावडर तर आंबापोळी, आंब्याचा गोळा, आंबा बर्फी असे विविध पदार्थ आंब्यापासून केले जातात. आम्रवृक्ष शुभ, पवित्र, मांगल्यदर्शक आणि ओरोग्यदायी आहेप्रश्नउन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो तेंव्हा काय उपाय करायला पाहिजे?

A. आंब्याचा रस खावा
B. आंबा बर्फी खावी
C. कैरीचे पन्हे प्यावे.
D. कैरीचे लोणचे खावे.
Answer» D. कैरीचे लोणचे खावे.


Discussion

No Comment Found

Related MCQs