MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या. सृजनकर्त्याने पहिल्यांदा निसर्ग बनवला. वातावरण, पाणी, जीवाणू, झाडे, झुडपे, पक्षी आणि मग मानवाचा जन्म आणि विकास झाला. या निसर्गाशिवाय मानवाचे अस्तित्व असूच शकत नाही आणि हे विधान विज्ञान सुद्धा मानते. आपल्या आकाशगंगेमध्ये लाख तारे, ग्रह आहेत. पण आपल्या निरिक्षण योग्य अवकाशात मात्र एकाच ठिकाणी जीवन सापडते ती जागा म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण आहे म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग, या वातावरणाशिवाय, निसर्गाशिवाय कुठल्याही ग्रहावरती जीवन बहरु शकत नाही. या निसर्गाने आपल्याला फक्त जन्म दिला नाही तर आपले संगोपनही केले आहे. निसर्ग आपल्याला फळ, फुले, भाज्या, धान्य देतो. पिण्यासाठी, साफसफाईसाठी पाणी देतो, घर बांधन्यासाठी लाकूड देतो. या निसर्गाशिवाय मनुष्य जीवनाची सुरुवात ही करु शकला नसता. या निसर्गाच्या अंगाखांद्यावर मनुष्य प्रगत होऊ लागला. त्याने हत्यारे बनवली, आग पेटवली, चाकाचा शेध लावला आणि या शोधाने मानवाचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. नवीन बनवलेल्या दगडांच्या हात्याराने तो शिकार करु लागला आगीच्या सहाय्याने तो ती शिकार शिजवून खायला शिकला. मनुष्याचे पोषण होऊ लागले. पुढे चाकाच्या साहाय्याने मनुष्य विविध टिकाणी वेगाने पोचू शकला. मानवाच्या प्रगतीमधील या तीन घटना सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत आणि हा उपहार | आपल्याला या निसर्गाने दिला आहे. पृथ्वीवर जीवन कोणत्या घटकांमूळे बहरु शकले? |
| A. | शुन्य आणि पाणी |
| B. | हवा आणि जमीन |
| C. | वातावरण आणि निसर्ग |
| D. | जीवजंतू आणि झाडे |
| Answer» D. जीवजंतू आणि झाडे | |