1.

खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या.अजिंठा लेणी ही औरंगाबाद पासून 100 ते 110 किमी अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी आहेत. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात या लेण्यांची निर्मिती झाली आहे असे मानले जाते. या लेणी समुहामध्ये एकूण 29 लेणी आहेत. ही लेणी नदीपात्रापासून 15 ते 30 | मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगरामध्ये कोरलेली आहेत. अजिंठा निर्मिती करणाच्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा दान प्रकारामध्ये या लेण्यांची निर्मिती केली आहे. या लेण्यामधील भिती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते. जातक कथांच्या आधारे केलेले कथांचे अंकन या लेण्यामध्ये दिसून येते. शिल्प चित्रकलेचा उत्कृष्ट नमूना म्हणून येथील लेणी जगभरात मान्यता पावली आहेत. चित्रांमधून व्यक्त होणा-या मानवी भावभावना आणि वापरलेले नैसर्गिक रंग हे येथील चित्रांचे वैशिष्ट्य आहे. अजिंठा लेणी ही देश-विदेशी पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. प्रश्न : अजिंठा लेण्यांची निर्मिती कोणत्या दोन प्रकारात केलेली आहेत?

A. चित्र व शिल्प
B. विहार आणि चैत्य
C. भगवान बुद्ध आणि बौद्ध विभूती
D. डोंगर आणि पठार
Answer» C. भगवान बुद्ध आणि बौद्ध विभूती


Discussion

No Comment Found

Related MCQs