1.

खालील उतारा वाचून त्यापुढील ९६ ते १०० प्रश्नांची उत्तरे द्या, आपण आपले जीवन अनेक वेळा रुपये-आणि-पैसे यांच्या हिशोबात बसविण्याचा प्रयत्न करतो. आपणाभोवती प्रतिष्ठेची खरीखोटी वलये निर्माण करतो आणि त्यामुळे निर्माण होणा-या चाकोरीला ‘जीवन असे नाव देऊन त्या जीवनातच आनंद मानण्याचा प्रयत्न करतो. जीवनात किती वेळा आपण मनसोक्त पावसात भिजायचेच या कल्पनेने पावसात छत्री न घेता बाहेर पडलो आहोत? ‘आनंदी आनंद गडे ! जिकडे तिकडे चोहिकडे !' असा बालकवी आपणास संदेश देतात; पण निसर्गातील हा आनंद लुटण्यासाठी आपणापैकी किती जण बाहेर पडतात ? संध्याकाळी घाईघाईने निघालेल्या एखाद्या गृहस्थास ‘कुठे जातोस?' असे आपण विचारले आणि सूर्यास्त पाहावयास मी जातो आहे असे त्याने उत्तर दिले तर आपण निश्चित ‘आ' करून त्याच्याकडे पाहत राहू. अरुण, संध्यारजनी, कौमुदी वगैरे सृष्टिदेवीची बालके शेवटी बालकवींच्या कवितेत राहतात आणि आम्ही चांदण्या रात्री विजेच्या दिव्याच्या कृत्रिम प्रकाशात ‘रमी खेळण्यात रमून गेलेलो असतो. फुलराणी' शिकविताना मी साच्या विद्यार्थ्यांना गुंगवून सोडल्याचे मला आठवते; पण वेलीवरच्या कोमल कलिकेचे सौंदर्य पाहण्याला मी कधी थांबलो असल्याचे मला आठवत नाही. निर्झराच्या गोड गीतात बालकवींना दिसलेला अर्थ मी विद्यार्थ्यांना कितीदा समजावून सांगितला असेल; पण निर्झराच्या काठाशी त्याची अवखळ गीते ऐकत मी उभा राहिल्याचे मला आठवत नाही. 100. वरील उताच्यातून व्यक्त होणारा मथितार्थ कोणता आहे ?

A. माणूस व निसर्ग हे दोघे वेगळे आहेत.
B. माणसाला निसर्गाची गरज नाही.
C. माणस निसर्गाला दरावला आहे.
D. माणूस निसर्गावर अवलंबून आहे.
Answer» D. माणूस निसर्गावर अवलंबून आहे.


Discussion

No Comment Found

Related MCQs