MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नक्रमांक ४१ ते ४५ ची उत्तरे लिहा. मराठी भाषा मरणोन्मुख झालेली आहे असे कुणीच म्हणणार नाही. तिची प्रकृती कदाचित राहावी तितकी बरोबर राहत नसेल. शास्त्रीय वाङ्मयाचा व्यायाम घेण्याचा तिला कंटाळा आहे. प्रेमाची खमंग फोडणी दिलेले पदार्थच तिला फार आवडतात. तिची वेषभूषा अगदी आजच्या घटकेला शोभणारी असली, तरी मन मात्र अजूनमागच्या काळात रेंगाळत आहे, इत्यादी आक्षेपात थोडासा तथ्यांश असला तरी तिच्या या तक्रारी काही काय टिकणाच्या नाहीत. ज्यांचे आसन सरस्वती मंदिरात स्थिर झाले आहे, अशा लोकप्रिय ललित लेखकांनी आप आवडीच्या शास्त्राविषयी वाङ्मय निर्माण करण्याचे ठरविले तर ते काय त्यांना अशक्य आहे? ‘गरज त पुरवठा' हे तत्त्व मला वाङ्मयातही मान्य आहे; पण ते पाळताना लेखकाने व्यापारी होऊ नये. डॉक्टर व्हावे रोग्याच्या शरीराला ज्या ज्या द्रव्याची जरूर असते ती ती औषधांच्या द्वारे त्याला देणे हेच डॉक्टरांचे कर्तव्य नव्हे का? शिवाय गरज तसा पुरवठा या तत्त्वाइतकेच गरज ही कल्पकतेची आई' हे तत्त्वही प्रसिद्ध आहे. म्हणजे पुरवठा व कल्पकता यांचे बहीण-भावंडाचे नाते होते. हे नाते पाळण्याची दक्षता लेखकांनी घ्यायला नको का? 45. ललित लेखकांनी कोणते नाते पाळण्याची दक्षता घ्यावी, असे लेखकास वाटते? |
| A. | पुरवठा व कल्पकता यांचे बहीण-भावंडाचे नाते पाळण्याची |
| B. | वाचकांच्या मनाला पटेल तसे लिहिण्याची. |
| C. | मनाला वाटेल तसेच लिहिण्याची. |
| D. | गरजेप्रमाणे लिहिण्याची. |
| Answer» B. वाचकांच्या मनाला पटेल तसे लिहिण्याची. | |