1.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ७७ ते ८१ ची उत्तरे लिहा. आपल्या भारतीय संस्कृतीत महाभारताचे स्थान आगळेच आहे. व्यास महर्षीनी लिहिलेल्या या महाका थोरवी इतकी महान आहे की, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण त्यापासून बोध घेऊ शकतो. महाभारत उत्कर्ष बिद म्हणजे कौरव-पांडवांमधील महायुद्ध. हे युद्ध लढले गेले कुरुक्षेत्रावर. प्राचीन काळात याच वि" वैदिक वाङ्मय लिहिले गेले. धार्मिक परंपरा, सामाजिक प्रथांचा उगमही याच ठिकाणी झाला. त्यामुळे या जागेला भारतीय संस्कृतीचे जन्मस्थान मानले जाते. महाभारतातील युद्धाच्या खाणाखुणा आजही भद्रकाली मंदिर, ब्रह्मसर, बाणगंगा, ज्योतिसार या ठिकाणी जपलेल्या आहेत. कुरुक्षेत्र हे ५१ शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. महाभारतातील युद्धाचे सर्वात मोठे फलित म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीता'. युद्धासाठी समोर उभे ठाकले आप्तस्वकीय पाहून गोंधळलेल्या अर्जुनाला धीर देऊन कर्मयोगाचा जो उपदेश भगवान श्रीकृष्णांनी केला, तो म्हणजे जगवंद्य ‘भगवद्गीता', कुरुक्षेत्रावरील ज्योतिसार येथे भगवद्गीता सांगितल्याचे मानले जाते. ज्या वटवृक्षाखाली श्रीकृष्णाने हा उपदेश केला, तो वटवृक्ष आजही पाहायला मिळतो. याच ठिकाणी श्रीकृष्णाने आपले विराट रूप दर्शन देऊन तोच या जगाचा प्रतिपालक आहे आणि संहारकही आहे याची प्रचिती दिली. | कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारे संपन्न म्युझियमही आहे. प्राचीन कालखंडातील विविध हस्तलिखिते, चित्रे, शिल्पे, कलाकृती, उत्खननात सापडलेले अवशेष येथे ठेवलेले आहेत. कुरुक्षेत्राचे दर्शन घेतल्यानंतर आपण प्राचीन गौरवशाली परंपरेचा हिस्सा आहोत या विचाराने मन भरून येते. 79. महाभारतातील युद्धाचे सर्वांत मोठे फलित म्हणजे

A. कौरव-पांडव महायुद्ध
B. भारतीय संस्कृती
C. श्रीमद्भगवद्गीता
D. धार्मिक परंपरा
Answer» D. धार्मिक परंपरा


Discussion

No Comment Found

Related MCQs