MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८६ ते ९० ची उत्तरे द्या. | साहित्याचे क्षेत्र हे स्वयंशासित असले पाहिजे, असे मी मानतो. लेखकावर कोणत्याही संस्थेने वा शासनाने नेहमीच्या परिस्थितीत बाह्य बंधने घालणे अयोग्य व अनिष्ट आहे, असे मला वाटते. त्याने कोणता विषय निवडावा, त्याची रचना कशी करावी हे ठरवण्याचे त्याला पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. त्याने आपली प्रतिभा तत्त्वनिरूपण, नीतिबोध, मतप्रचार यांसाठी राबवावी अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. मग साहित्याची बांधिलकी म्हणजे तरी काय असा प्रश्न शिल्लक राहतो. लेखकाची बांधिलकी स्वत:शीच असली पाहिजे. त्याने स्वत:च्या जीवननिष्ठेशी, अनुभवाशी व वाङ्मयीन माध्यमाशी इमान राखले म्हणजे झाले. कोणत्याही ठरावीक पद्धतीने सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची त्याच्यावर सक्ती करणे श्रेयस्कर नाही. व्यक्ती व समाज यांच्यातील संबंध आणि सास्कृतिक जीवनातील साहित्याचे स्थान यांसंबंधीचा त्याचा दृष्टिकोन निकोप, सुस्पष्ट व मुलग्राही ल, तर त्याच्या वाङ्मयात समाजपराङ्मुखतेचा लवलेशही आढळणार नाही. उलट त्याची अस्मिता संपूर्ण माजिक जीवनाला सामावून घेण्याइतकी विशुद्ध व व्यापक बनलेली असेल. 88.लेखकास कशाचे स्वातंत्र्य असावे? |
| A. | सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे. |
| B. | तत्वनिरूपणाचे |
| C. | नीतिबोध शिकविण्याचे. |
| D. | विषयनिवडीचे व रचनेचे |
| Answer» E. | |