1.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 107 ते 111 गाडगे महाराज हे महान समाजसुधारक संत होऊन गेले. दारिद्रय, अज्ञान, अंधश्रद्धा, देवधर्म, कर्मकांड. भोळेपणा, जातपात व व्यसने यांत बुडून गेलेल्या समाजाला त्यांनी नवा मार्ग दाखवला. त्यासाठी त्यांनी केवळ भाषणबाजी केली नाही. त्यांच्या हातातील खराटा हेच त्यांचे साधन होते. गावातील गलिच्छ वस्त्या ते झाड़न स्वच्छ करीत. पुढे जनमानसातील कचरा साफ करण्याचे अखंड व्रत आयुष्यभर चालवले. फुकटचे त्यांनी स्वत: कधी खाल्ले नाही व इतरांना खाऊ दिले नाही. श्रमांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. गरिबीचे मूळ अज्ञानात, व्यसनात, गलिच्छपणात व आळसात आहे हे त्यांनी लोकांना पटवले. लक्षावधी रुपये वर्गणीरूपाने जमवून त्यांनी धर्मशाळा, गोशाळा, पाठशाळा, पाणपोया बांधल्या व लोकहिताची कामे केली. यात्रा मेळे यांना ते जात ते जनताजनार्दनांच्या सेवेसाठी. आंधळ्यांची, अपंगांची, रंजल्यागांजल्यांची सेवा ही त्यांनी विठ्ठलाची भक्ती मानली. लक्षावधी रुपये जमवून त्यांतील पैचाही विनियोग त्यांनी कधी स्वतःसाठी केला नाही. पै-पैचा हिशोब ते वहीत टिपून ठेवत. ती चोपडी सदैव त्यांच्या गळ्यात अडकवलेली असे. कुणीही येऊन त्यांचे हिशोब पाहू शकत असे. त्यांचा व्यवहार कसा खुल्लामखुल्ला होता. स्वत:च्या बायकोने आजारपणात गोशाळेतील गाईचे दूध घेतले. म्हणून तशाही अवस्थेत त्यांनी तिला सबंध गोशाळा साफ करण्याची शिक्षा दिली. सार्वजनिक जीवनात आर्थिक व्यवहार सांभाळणारा मनुष्य किती स्वच्छ असावा याचा गाडगेबाबा हे एक अत्युच्च आदर्शच होते. 111.गाडगे महाराजांनी कोणती विठ्ठलभक्ती मानली ?

A. समाजाला सुमार्गातून परावृत्त करणे
B. धर्मशाळा न बांधणे
C. रंजल्यागांजल्याची सेवा करणे
D. गावाची स्वच्छता न करणे.
Answer» D. गावाची स्वच्छता न करणे.


Discussion

No Comment Found

Related MCQs