1.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८२ ते ८६ ची उत्तरे लिहा. दु:खे येतात ती आपली कसोटी पाहण्यासाठीच येतात. त्या वेळी न डगमगणे हाच खरा पुरुषार्थ. भट्टीतून तावूनसुलाखून निघाल्याखेरीज सोन्याला तेज चढत नाही किंवा टाकीचे घाव सोसल्याखेरीज दगडाला देवपण येत नाही, हे आपणाला माहीत नाही काय? पैलू पाडल्याशिवाय हि-यालासुद्धा किंमत येत नाही. आपणावर कोसळणारी द:खे ही अशीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्यासाठी निर्माण झाली आहेत असे आपण का समजू नये? शिवाय असे पाहा, जगात दु:खे आहेत म्हणून सुखाची किंमत आपणास कळते ना? जगात-अंधारी रात्र आहे म्हणूनच चंद्राला महत्त्व. त्याचप्रमाणे दु:ख आहे म्हणूनच जगात सुखाचे महत्त्व आहे असे तुम्हालानाही वाटत? नुसते गोड जेवण जेवण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे काय? नुसत्या गोडाने तोंडाला कशी मिठी बसते, हे तुम्हाला माहीत आहेच. केवळ सुखच जगात असते तर अशीच आपली स्थिती झाली नसती का? शिवाय दुःखानंतर सुख आले म्हणजे त्याची लज्जत काही न्यारीच असते असा अनुभव कुणाला नाही ? परीक्षेसाठी मरमर कष्ट केल्यानंतरच निकालाच्या आनंदाची खरी गोडी आपणास कळते. असे जर आहे तर वर्तमानकाळच्या दुःखाबद्दल आपण कुरकुर का करावी? आणि दुःख पर्वताएवढे असे का मानावे ? 84. सुखाची किंमत कशामुळे कळते ?

A. दुःख नसल्यामुळे
B. सुखप्राप्तीमुळे
C. दुःखामुळे
D. सुख नसल्यामुळे
Answer» D. सुख नसल्यामुळे


Discussion

No Comment Found

Related MCQs