1.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 116 ते 120 ची उत्तरे द्या. माणसांचा बाजार भरला म्हणजे विक्रीला योग्य तो माल तयार केला जातो. पुरुष आपल्या मालकाला हवे असतील तसे परिश्रम करायला शिकतो आणि स्त्री पुरुषाला आवडेल तसे शरीर नटविते. ईश्वराने दिलेल्या अवयवांना छिद्रे पाडून शरीराच्या सौंदर्यात भर घालते. ज्याला सौंदर्य पाहायची दृष्टी असेल त्याला माणसाचे नुसते शरीर सुंदर दिसेल. एखाद्याचे शरीर किंवा एखाद्याचे श्रम विकत घ्यावे, ही गोष्टच त्याला खपणार नाही. सुवर्णयुगापेक्षाही मानव्याचे युग श्रेष्ठ आहे. सत्तेच्या युगापेक्षा सत्ययुग अधिक मंगलकारक आहे. सत्ययुगात माणसाची सत्ता चालणार नाही. माणूस माणसाला विकला जाणार नाही. त्याला कुणी वर्गहीन समाज म्हणोत, आम्ही त्याला मानवाचे स्वराज्य म्हणतो. असे मानवाचे युग आणायला शस्त्रवाद, प्रभुत्ववाद व यंत्रवाद या तिन्ही वादांचा नायनाट झाला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की, यंत्र किंवा उपकरणे मुळीच नकोत. त्यांचा उपयोग असा झाला पाहिजे की, त्यांच्या योगाने मानवाच्या सर्व नैसर्गिक शक्तींचा व्यवस्थित विकास होईल, इतकेच म्हणायचे आहे. 118. बाजाराचे वैशिष्ट्य काय असते?

A. माणसांची खूप गर्दी असते.
B. विक्रीसाठी खुप माल असतो.
C. बाजारात खूप यंत्रे-उपकरणे असतात.
D. विक्रीयोग्य माल तयार केला जातो
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs