1.

खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक ८७ ते ९१ ची उत्तरे द्या. जातीने मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो, हा विचार सर्व संत-महंतांनी आणि विचारवंतांनी पुसून टाकण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. संतांचे विचार आणि आचार समतेचे द्योतक आहेत. ज्याच्या मनात समता नाही आणि ममताही नाही, त्याला संतत्वाच्या आणि देवत्वाच्या जवळ जाण्याचा अधिकार कधीच लाभणार नाही. तोच खरा अस्पृश्य समजावा. ही विशाल आणि सर्वसमावेशक दृष्टी संतांच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ' आणि 'जे जे भेटे भूत ते ते जाणिजे भगवंत' हा उदात्त विचार तर्कशुद्ध आहे. आपल्या खांद्यावर जातीय उच्चनीचतेचे जे पिशाच्च शतकानुशतके ठाण मांडून बसले आहे, ते फेकून दिले पाहिजे, हे अनेक संतांनी गर्जून सांगितले आहे. परोपरीने सांगितले आहे. पण माणसाचा मुर्दाडपणा अलौकिक आहे. संतांच्या कपाळावर त्याने जाती-वर्णाची लेबले तत्परतेने आणि धूर्तपणे चिकटविली. खरे तर साधूचीच काय सर्वसामान्यांचीही जात माणूसच असते, माणूसच असावी. माणसांची जाती वाढावी. मानव्याची उंची वाढत जावी; हे संतांचे स्वप्न आहे. पण हे घडत नाही; म्हणून संतांच्या वाणीला अनेक वेळा हुंदके फुटलेले आहेत. 89.लेखकाच्या मते खरा संत कोण? |

A. ज्याच्या मनात समता आणि ममता नाही तो
B. ज्याच्या मनात समता आणि ममता आहे तो
C. ज्याच्या मनात समता आहे पण ममता नाही तो
D. जो समता व ममताच्या पलीकडे आहे तो
Answer» C. ज्याच्या मनात समता आहे पण ममता नाही तो


Discussion

No Comment Found

Related MCQs