1.

खालील उतारा वाचून प्रश्नक्रमांक 116 ते 121 ची उत्तरे द्या. प्रतिभा दैवी वगैरे नसते, ती छान मानवीच असते. फक्त माणसे अपूर्व सुखांची फुलवण करणा-या त्या यातनाघराकडे पाठ फिरवतात. दुःखाना घाबरतात, त्यामुळे अथांग सुखांना मुकतात. स्वतःचे काळीज ज्वाळेवर धरून पाहण्याची कल्पना करा. पण प्रथम काळजाला जखमा होतात. नंतर कधीही न कोमेजणारी या जखमांचीच | फुले होतात. प्रतिभा प्रत्येकच व्यक्तीजवळ असते. तिला पैलू पाडता येतात. आपल्या वाट्याला आलेल्या काळाच्या पहाडात सुंदर लेणी खोदता येतात. फक्त वाईटाने आपले मन बेसुमार दुखले पाहिजे. चांगल्याची त्याला अनावर तहान लागली पाहिजे. प्रतिभा या शब्दात दोन घटक आहेत. एक घटक आहे ‘प्रति' हा आणि दुसरा आहे ‘भा' हा. प्रति म्हणजे दुसरा आणि ‘भा' म्हणजे प्रकाश. दुसरा म्हणजे आहे त्याहून वेगळा. हा वेगळा प्रकाश निर्माण करणारी मन:शक्ती म्हणजे प्रतिभा. अनेक मनांमध्ये अंधारच आहे. अनेक जंगलांमध्ये अंधारच आहे. अनेक झोपड्यांमध्ये आणि घरांमध्ये अंधारच आहे. अनेक मुठींमध्ये अंधारच आहे. या सर्व अंधारांपर्यंत पोचणे सूर्याला शक्य होत नाही. ही सूर्याची फार मोठी उणीव होय. मानवी प्रतिभेला ही मर्यादा नाही. सूर्याचा प्रकाश जर जीवनातील हा अनंत अंधार नष्ट करू शकत नसेल तर तो अंधार नष्ट करण्यासाठी दुसरा आणि नवा उजेड निर्माण करण्याची गरज निर्माण होते. मानवी प्रतिभा हे कार्य करते. 119. जीवनातील अंधार कोण नष्ट करू शकते ?

A. काजवा
B. सूर्याचा अस्त
C. मानवी प्रतिभा
D. चंद्र
Answer» D. चंद्र


Discussion

No Comment Found

Related MCQs