1.

खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२६ ते १३० या प्रश्नांची उत्तरे द्या. | आकाश निरभ्र होते. सूर्यबिंब लाल झाले होते; पण ती पराक्रमाची लाली वाटत नव्हती. श्रेष्ठ व महान पुरुष आपत्काळीसुद्धा विलक्षण धैर्याने वागतो त्या वेळी त्याच्या मुखावर जी एक अपूर्व शोभा झळकत असते, तशीच ही शोभा वाटत होती. क्षणभरसुद्धा विसावा न घेता, कसल्याही फळाची आकांक्षा न धरता, जगाची एवढी सेवा करणारा हा कर्मवीर जगातील कृतघ्नतेच्या जाणिवेमुळे जणू काही कष्टी झाला आहे, असे वाटत होते. जगाचा कानाकोपरा आपल्या प्रकाशाने उजळणारा, अनंत जिवांना प्रेरणा नव्हे, जीवनसत्त्वे देणारा प्रवासी एक मुक्काम करून दुस-या मुक्कामाकडे जायला निघाला होता. एखाद्या वर्तमानपत्राचा बातमीदार बातम्या देण्यासाठी घाईघाईने आपल्या कार्यालयाकडे धावपळ करीत जाताना दिसतो, त्याप्रमाणे जगातील सर्व घडामोडींचा साक्षीदार जगाचे इतिवृत्त विश्वनिर्मात्याकडे रुजू करण्यासाठी जात असावा. त्याने काय पाहिले असेल, याची संपूर्ण कल्पना कुणालाही येऊ शकत नाही. मनुष्य जे जे काही करीत असतो, त्याचे साक्षीदार सृष्टीतील प्रभावी द्रव्ये असतात. चंद्र, सूर्य आणि ही भूमी या सर्वांना मनुष्य शरीराने जे करतो आणि मनाने जे चिंतितो ते सारे अवगत असते, असे धर्मशास्त्र सांगते. हे खरे असेल काय? आणि तसे असेल तर माझ्या मनातले विचार हा सूर्यनारायण खास जाणीत असला पाहिजे. 129.हा कर्मवीर कशामुळे व्यथित झाला असावा ?

A. दीर्घ प्रवासामुळे
B. लोकांकडे कृतज्ञता नसल्यामुळे
C. घाईघाईने काम करावे लागल्यामुळे .
D. सतत जगाची सेवा करावी लागते म्हणून
Answer» C. घाईघाईने काम करावे लागल्यामुळे .


Discussion

No Comment Found

Related MCQs