1.

खालील उतारा वाचून प्रश्न क्र. १२१ ते १२५ ची उत्तरे द्या. ‘सत्य’ आणि ‘अहिंसा' या दोन मूल्यांचा गांधीजींनी सातत्याने पुरस्कार केला. भित्रा माणूस कधीही सत्यवादी असू शकत नाही. निर्भय बनण्यासाठी सत्यनिष्ठ बनले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. पंडित नेहरू त्यांच्याविषयी लिहितात, 'गांधीजींच्या इतका सत्यनिष्ठ पुरुष मला तरी माहीत नाही. राजकारणी मनुष्यात इतकी सत्यनिष्ठा असणे म्हणजे हा धोक्याचा सद्गुण होय; कारण असा पुरुष स्वत:चे मत बोलून दाखवितो आणि मनातील फेरबदल, मनातील घडामोडी तो लोकांसमोर इतक्या उघड्या करून ठेवतो की त्यांनी पाहावे.' अहिंसेची व्याख्या गांधीजींनी फार व्यापक केलेली आहे. अन्यायाला प्रतिकार अहिंसेने करणे हे केव्हाही श्रेष्ठ, असे ते मानत होते. परंतु भीतीमुळे अन्याय सहन करण्यापेक्षा हिंसेने उत्तर दिले तर योग्य ठरेल अशी त्यांची भूमिका होती. ‘भीती व हिंसा असे दोनच पर्याय उपलब्ध असतील तर मी हिंसेच्या बाजूचा आहे,' असे गांधी म्हणत असत. त्यांना बलवानाची अहिंसा अभिप्रेत होती. गांधीजींचा साधनशुचितेवर भर होता, आणि म्हणूनच स्वातंत्र्यलढ्यामध्ये अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करीत असताना हिंसेचे गालबोट लागू नये असा त्यांचा कटाक्ष होता. , गांधीजींचे सारे तत्त्वज्ञान मानवाच्या कल्याणाचा विचार करणारे आहे. आदर्श भारता' विषयी आपले मनोगत व्यक्त करताना गांधीजी लिहितात, ‘हा देश आपला आहे असे जेथे त्यांना वाटेल, जेथे वरिष्ठ व कनिष्ठ असे वर्गभेद लोकांत मुळीच नाहीत, जेथे सर्व जमाती सलोख्याने एकजीव नांदत आहेत.... या भारतात अस्पृश्यता, मादक पेये व अमली पदार्थ या उपाधींना जागाच नाही.... स्त्रियांना पुरुषांचे सारे हक्क असतील.... असा भारत देश असावा असे माझे मनोराज्य आहे.'123. ‘आदर्श भारताविषयी गांधीजींचे मनोगत कोणते ?

A. वरिष्ठ-कनिष्ठ वर्गभेद असणे.
B. जमातीत वितुष्ट
C. अमली पदार्थांना प्राधान्य
D. स्त्रियांना पुरुषांचे सारे हक्क
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs