MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून प्रश्न क्र. 112 ते 116 ची उत्तरे द्या. आपण झाडे को पूजतो? अर्थात् इतर वस्तूंची पूजा करण्यास जी कारणे असतील तीच झाडांची पूजा करण्यासही असली पाहिजेत. जो मनुष्य स्वतः पराक्रमी आहे, किंवा ज्याचा पराक्रमी पुरुषाशी कोणत्याही प्रकारचा संबंध आहे, अथवा ज्यापासून लोकांचे कोणत्याही प्रकारचे मोठे हित होत आहे, अशा प्रकारच्या मनुष्याला बहुधा लोकांत मान मिळतो. हाच मान वाढला म्हणजे त्याला पूजा म्हणतात; व ही पूजा करण्याची बुद्धी आपल्या अंतकरणात उत्पन्न झाली म्हणजे आपण तिला पूज्यबुद्धी म्हणतो. वड, पिंपळ, उंबर, आपटा, शमी, तुळस, बल --वगैरे झाडांविषयी आमच्या मनांत जी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली आहे ती वर थोडक्यात सांगितलेल्या कारणांपैकी कोणत्या तरी कारणांनी उद्भवली असावी यात संशय नाही. जिरेनिअमप्रमाणे तुळशीत हवा स्वच्छ करण्याचा गुण फार आहे, म्हणून आम्ही सारे तिचे भक्त बनलो आहो किंवा, सर टी. माधव रावांनी एकदा सुचविल्याप्रमाण बेल, तुळस आणि गवती चहा याचा चहा ऊर्फ गोडा काढा रोज सकाळी घेतल्यास वातपित्त कफाची विशेष बाधा न होता प्रकृती साफ राहण्यासारखे गुण तीत आहेत, म्हणून आम्ही तिला देवांच्या पूजेतील एक अत्यावश्यक द्रव्य केले आणि सर्व ऋतूत बायकांना तिच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यास लाविले, हे निश्चयान सांगता येत नाही; तथापि एवढे खरे आहे की, ह्या झाडांच्या अंगच्या कसल्या तरी चांगल्या गुणाबद्दल त्याला आमच्या घरात व देवळात इतके महत्त्वाचे स्थान मिळाले असावे! वड, पिंपळ, उंबर वगैरे मोठ्या गद छायचा झाडे आहेत, आणि त्यांपासून पांथांस व इतरास मोठे सुख होते म्हणून त्यास देवत्व प्राप्त झाले असावे असे प्रथमदर्शनी वाटण्याचा संभव आहे. पण वास्तविक कारण तसे दिसत नाही, तसे असेल तर आबा, बकुळ, फणस वगैरे दाट छायेची झाडे पूज्य का झाली नाहीत? आंबा व फणस छायेला चांगले असून खायलाही काही वाईट नाहीत! तेव्हा फायद्याच्या दृष्टीने हीं झाडे विशेष पूज्य व्हायला पाहिजे होतीं. 113.वातपित्त कफाची विशेष बाधा कशामुळे होत नाही ? |
| A. | बेल, तुळस आणि गवती चहा यांच्या काढ्यामुळे |
| B. | औषध उपचार घेतल्यामुळे |
| C. | सर्दी झाल्यामुळे |
| D. | ताप आल्यामुळे |
| Answer» B. औषध उपचार घेतल्यामुळे | |