MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खालील उतारा वाचून प्र. क्र. 56 ते 60 या प्रश्नांची योग्य ती पर्यायी उत्तरे लिहा. जगातील नामवंत साहित्यिकांनी साहित्याचे हे विश्व किती संपन्न केलं आहे! ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली व तिच्यामधून जीवनाविषयीचं गहन चिंतन प्रकट केलं. नामदेव-तुकोबांनी अभंग लिहिले व त्यांतून प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा, याची पायवाट दाखविली! एकनाथानी भागवतामधून नवविधा भक्तीचे पाट वाहविले. रामदासांनी दासबोधातून यत्न तो देव का जाणावा, याच मार्मिक विवरण केलं. श्रीचक्रधरस्वामींच्या लीळा चरित्रातून आध्यात्मिक व सामाजिक समतेचा संदेश प्रकटला. ही तर झाली संतवाणी. वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र ग्रंथांचे वाचन केलं तर त्यातून काय आढळतं? वेद-उपनिषद, कुराण, धम्मपद, बायबल, गुरुग्रंथसाहेब या सर्वच धर्मग्रंथात उदात्त जीवनादर्शाचे विवरण केलं आहे. त्याच आचरण केल्यास आपल्या जीवनशैलीत केवढं परिवर्तन घडतं. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो. पावित्र्य, मांगल्य, शुचित्व या मूल्यांची महानता आपल्याला जाणवते. दया, क्षमा, करुणा, प्रेम, परस्पर सामंजस्य, बंधुत्व, एकात्मता या मूल्यांची महती या धर्मग्रंथांच्या वाचनानं कळते. ऐहिक जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं व आध्यात्मिक वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन लाभतं. धर्मग्रंथांचे हे नंदादीप नसते तर आपण ही वाटचाल कशाच्या आधारे केली असती? ग्रंथांमध्ये ज्ञानाच्या अनेकविध शाखा जशा प्रकाशमान होतात, त्याचप्रमाणे विज्ञानाच्याही अनेकविध शाखांचं दर्शन घडतं. तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, परातत्त्व संस्कती या विषयांची कितीतरी दालनं ग्रंथांनीच आपल्यासाठी उघडलीत ना? वैज्ञानिकांनी अहोरात्र परिश्रम केले व त्यांतून त्यांना अनेक शोध लागले. या शोधांचे विवरण त्यांनी आपल्या ग्रंथांतूनच नाही का केलं? या शोधांमुळे मानवाच्या बुद्धीनं अवकाशापर्यंत व ग्रहगोलांपर्यंत कशी झेप घेतली, ते त्यांच्या ग्रंथांमुळे आपल्याला कळतं. हे ग्रंथ आपण वाचले नाहीत व या शोधांची माहिती घेतली नाही तर जग कुणीकडे चाललं आहे, याची आपल्याला कशी कल्पना येणार? ललित वाङ्मयाच्या वाचनानं आपलं मनोरंजन होतं; त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लेखकांच्या भावविश्वाचं दर्शन घडतं. प्रवासवर्णनपर ग्रंथ आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशांत घेऊन जातात. तिथले जगावेगळे अनुभव, तिथली माणसं, तिथला निसर्ग, तिथल्या रीतिभाती, तिथल्या जीवनशैली यांचा व आपला परिचय होतो. लेखकांना या प्रदेशात आलेले अनुभव आपलंही मन मोहून टाकतात. ‘गावाकडच्या गोष्टी' व 'माणदेशी माणसं' यांच्यासारख्या व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकांतून ग्रामीण जीवन किती हुबेहूब साकार होतं! शंकर पाटील यांच्या आभाळ’, ‘भेटीगाठी', 'वळीव' यांसारख्या ग्रामीण कथासंग्रहांतून ग्रामीण जीवनाच्या व्यथावेदना जशा प्रकटतात, त्याचप्रमाणे त्यांच्या 'धिंड' सारख्या कथा खदखदून हसायला लावतात. त्यांच्या ग्रामीण संवादांची कोल्हापुरी फेक कशी न्यारी आहे, हे त्यांच्या कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'लवंगी मिरची कोल्हापूरची' यांसारख्या वगनाट्यांमुळं जाणवतं. 57. खालील काही विधाने पहा. (a) शंकर पाटलांच्या 'धिंड' सारख्या कथा म्हणजे करुणरसाचे डोहच होत. (b) गावाकडच्या गोष्टी'तून ग्रामीण जीवन कळते. (c) वळीव' या कथेतून शंकर पाटलांनी पुरते हसवून सोडले आहे. (d) ग्रामीण संवादाची कोल्हापुरी फेक ना. स. इनामदारांच्यात आहे. पर्यायी उत्तरांतून योग्य उत्तर शोधा. |
| A. | (a) |
| B. | (b) |
| C. | (c) |
| D. | (d) |
| Answer» C. (c) | |