MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे की व्यक्तीला? समाजासाठी व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणजे माया आहे. समाज सत्य आहे. अद्वैत सत्य आणि द्वैत मिथ्या आहे. श्री शंकराचार्य संसाराला मिथ्या मानतात याचा अर्थ काय? व्यक्तीचा संसार मिथ्या आहे. माझ्या आजूबाजूला दु:ख असताना मी एकटा सुखी होऊ पाहणे म्हणजे भ्रम आहे. आजूबाजूला आग लागली असता माझे एकट्याचे घर सुरक्षित कसे राहील? जगात केवळ स्वत:साठी पाहता येणार नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जर केवळ स्वत:पुरते पाहील तर कुटुंबाचा नाश होईल, त्या कुटुंबात आनंद कसा दिसेल? समाधान कसे नांदेल? ज्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती इतरांच्या सुखात स्वत:चे सुख मानते, तेच कुटुंब भरभराटेल, सुखी व आनंदी दिसेल. जो नियम कुटुंबाला लागू तोच समाजाला, सर्व संसाराला. आपण समाजासाठी आहोत, मानवजातीसाठी आहोत, सर्व प्राणिमात्रांसाठी आहोत. दगड अलग पडला तर त्याला महत्त्व नाही; परंतु तो इमारतीत संयमपूर्वक बसेल, तर त्याला अमरता येते, त्याला महत्त्व येते. आपण या समाजाच्या सुंदर इमारतीत योग्य ठिकाणी बसले पाहिजे व तेथे शोभले पाहिजे. 124. कोणती गोष्ट कुटुंबाच्या नाशास कारणीभूत ठरेल? । |
| A. | अद्वैतवादी जाणीव |
| B. | प्रपंच |
| C. | सुखोपभोग |
| D. | संकुचित स्वार्थ |
| Answer» E. | |